Tuesday, 4 September 2012

अंकूश हवाच



            २८ ऑगस्ट रोजी प्रेस कौन्सिल चे अध्यक्ष यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियावर 
 PCI चे नियत्रंण आणावे असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मांडला.   आणि त्यावर Indian 
Newspaper Association ने विरोध दर्शविला आहे.  आयएनएसचे म्हणणे असे की . प्रिंट आणि 
इलेक्ट्रॉनिक मीडिया ही स्वतंत्र माध्यमे असून त्यांच्यासाठी स्वतंत्र नियमावलीची आवश्यकता आहे. तसेच 
भारतातील पत्रकारिता स्वतःवर नियंत्रण ठेवण्या इतकी प्रगल्भ असून लोकशाहीचा हा चौथा स्तंभ
 आपली जबाबदारी चोख बजावत आहे, असेही आयएनएसने म्हटले आहे
देशातील वृत्तपत्रे व वृत्तसंस्था यांच्या दर्जा उंचावण्यासाठी तसेच प्रसारमाध्यमांचे 
स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी संसदेने नेमलेली प्रेस कौन्सिल ही स्वायत्त संस्था आहे .  
त्यांना दिलेली जबाबदारी पुरेशी असून इलेक्ट्रॉनिक मीडियावर त्यांचे नियंत्रण आणू नये, असे स्पष्ट मत 
आयएनएसने नोंदवले आहे . सध्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियावर थोडा फार अंकुश असावा. 
 सर्व मीडिया या घोड्यासारखा चौफेर उधळला आहे.  त्याला कुठेतरी लगाम बसला पाहिजे. 
व्यंगचित्रांतून राजकीय टीका व्हावी पण वैयक्तिक आयुष्यावर घाला नको.  खाली फोटो पाहिल्यास अंदाज 
येईल की सोशल मीडियावर कसा मुर्खपणाचा कळस गाठला आहे.



आणि हे फोटो कोण तयार करतं, तर जी मुलं ज्यांना राजकीय ज्ञान अगदी शून्य असतं, आणि थोडफार फोटोशॉप येतं म्हणून.

 चांगल्याही गोष्टी होतात त्यात वाद नाही





पण संपूर्ण मीडियावर पूर्णपणे अंकूश हवाच नाहीतर चीनसारखी परिस्थिती भारतात यायला वेळ लागणार नाही.



No comments:

Post a Comment