Wednesday, 26 September 2012

वडापाव १० रू आणि कॉल १ रूपयाहून कमी



दहा वर्षापूर्वी किंवा आधी वडापाव एक रूपयला होता आणि कॉलिंग १० रूपये होता.  काळ बदलला आणि वेळ वाईट आली.  वडापाव १०रू आणि कॉल १ रूपयाहून कमी दीड दशकांपूर्वी दुमदुमलेल्या दूरसंवाद क्रांतीने एक आवर्तन पूर्ण करून आता दुसऱ्यात प्रवेश केला आहे. बाजारात बऱ्यापैकी हातपाय पसरलेल्या कंपन्यांनी आता नव्या समस्यांकडे होरा वळविला आहे. एकीकडे स्पर्धेच्या दबावापायी ग्राहकांना किफायतशीर दर द्यायचे; तर दुसरीकडे उत्तम सेवा, उत्तम नेटवर्क देण्यासाठी प्रचंड भांडवली खर्चाच्या विस्तारासाठी निरंतर पैसाही ओतायचा आणि नफाक्षमतेला कात्री लावायची अशा विचित्र कोंडीत मोबाइल कंपन्या आहेत.  ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न म्हणून, चालू वर्षांतील दुसऱ्या दरवाढीचे संकेत रोमिंग शुल्क एप्रिल २०१३ पासून माफ करण्याच्या केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या घोषणेआधीच आले आहेत. मोबाइल कंपन्यांचे महसुली गणित हे प्रति मिनिट-प्रति ग्राहक वापरावर आधारलेले असते. भारंभार ग्राहकसंख्या वाढली तरी त्या ग्राहकांकडून सेवेचा वापर किती प्रमाणात होतो हे महत्त्वाचे.

No comments:

Post a Comment